HomeBlogआरोग्य / Aarogyaअॅलर्जीचा बागुलबुवा -वैद्य क्...

अॅलर्जी म्हणजे एखादी गोष्ट शरीराला न मानवणे, शरीराने न स्वीकारणे. यामध्ये शंभरपैकी ९९ लोकांना त्रास होत नसलेल्या गोष्टीचा एखाद्यालाच विलक्षण त्रास होतो. अॅलर्जी या विकारात व्याधीक्षमत्व वाढणे आवश्यक असते.
अन्नपदार्थातून :
लक्षणे :
अॅलर्जीच्या कारणानुसार लक्षणे दिसतात जसे की अंगावर पुरळ, दमा, सर्दी, अंगाला अतिशय खाज, सूज येणे, उलट्या, जुलाब, डोके जड होणे, सर्व अंगाची आग, लघवीला जळजळ अथवा प्रमाण कमी होणे इ. आयुर्वेद याचा सम्यक विचार करतो. कारणानुसार व लक्षणानुसार वात, पित्त , कफ या ३ दोषांच्या अनुषंगाने चिकित्सा दिल्यास उत्तम गुण आलेला दिसतो.
तपासणी :
अॅलर्जीसाठी रक्ताची, त्वचेची तपासणी करण्याची सोय आज उपलब्ध आहे यामुळे अॅलर्जीचे निदान लवकर होऊ शकते. यासह अॅलर्जीग्रस्त भागाचे संपूर्ण परीक्षण, त्वचेच्या रंगातील बदल, फोड, सूज, दडसपणा इ. त्याकरिता जीभ, घसा पाहणे, श्वसन संस्थेतील बिघाड स्टेथोस्कोपच्या साहाय्याने बघणे त्यावरून कफ,धूळ, चिकटा याचा अंदाज येतो. लघवी, मलपरीक्षणामुळे वृक्क व यकृत यांचे कार्यातील संभाव्य वैगुण्य लक्षात येते. नाडी, त्वचा यांच्या परीक्षणामुळे रस-रक्त यातील विकृती समजतात. यासर्वांवरून आयुर्वेद उपचारांची दिशा निश्चित होते.
काही उपाय :
पथ्य :
अॅलर्जी विकारात पथ्यापथ्य देखील महत्त्वाचे ठरते. अळणी जेवण म्हणजेच तिखट , खारट आंबट आहार वर्ज्य करावा. व्यसने टाळावीत. रात्री जागरण टाळावे. मूग, पडवळ, भोपळा, दोडके, कारले, ज्वारी, बाजरीची भाकरी, तांदूळ भाजून केलेला भात हे पदार्थ पथ्यकर आहेत. त्वचेला लावण्यासाठी साबण टाळून उटणे वापरावे. दिनचर्येत सांगितलेले नियम जसे की सूर्योदय समयी उठणे, भोजनोत्तर औषधी तांबूल सेवन, प्रत्येक ऋतूमध्ये सांगितलेले पंचकर्म करणे. अर्थातच हे सर्व म्हणजे आयुर्वेदात अॅलर्जीबद्दल काय काय सांगितले आहे ह्याबद्दल झाले. परंतु स्वतःची प्रकृती , कौटुंबिक व्याधी इतिहास ह्या गोष्टी जवळच्या वैद्याकडून तपासून घेऊन मग अॅलर्जीची चिकित्सा घेणे हे सर्वोत्तम !!!